Header Ads

Breaking News

एमपीएससी पूर्व परिक्षा पुढे ढकलली| MPSC Preliminary Exam Update|

MPSC Preliminary Exam Update

आगामी विधानसभा निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे टाळण्यासाठी राजकीय पक्षांच्या दबावामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्टची राज्यसेवा पूर्व परीक्षा चौथ्यांदा रद्द केली होती. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या २ लाख २५ हजार उमेदवारांपैकी जवळपास ५ हजार उमेदवार 'आयबीपीएस'ची परीक्षा देणारे असतात. कृषी सेवा परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचे दोन दिवसांपूर्वीच आयोगाने जाहीर केले होते. तरीसुद्धा काही हजार उमेदवारांसाठी लाखो उमेदवारांना वेठीस धरल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आता परीक्षा कधी होणार हा गंभीर प्रश्न उमेदवारांसमोर निर्माण झाला असून, एमपीएससीमधील सूत्रांनी यासंदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे परीक्षा नियोजन करणे आता सोपे होणार आहे.

एमपीएससीने परीक्षा पुढे का धकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षार्थींनी पुण्यात ठिय्या आंदोलन केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. त्यानंतर २२ ऑगस्टला सकाळी दहा वाजता एमपीएससीची बैठक झाली, ज्यामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

कृषि सेवा परीक्षा स्वतंत्र होणार

कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश राज्यसेवा परीक्षेत करण्याची मागणी परीक्षार्थींकडून करण्यात आली आहे. मात्र, कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्यामुळे २५ ऑगस्टच्या परीक्षेत या पदांचा समावेश करणे शक्य नसल्याचे आयोगाने २० ऑगस्टला जाहीर केले होते. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे, आयोगाकडे मागणीपत्र आल्यास राज्यसेवा परीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश केला जाईल अशी शक्यता होती. मात्र, हे मागणीपत्र परत सरकारकडे पाठवण्यात आले आहे, त्यामुळे या पदांचा परीक्षेत समावेश होणे अशक्य आहे.

आयोग पूर्व परिक्षेची तारीख कधी जाहिर करणार? 

एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे, आणि सर्व प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहोचल्या आहेत, त्यामुळे परीक्षा कधीही घेणे शक्य आहे. मात्र, आगामी विधानसभेच्या निवडणुकांमुळे परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता राज्यसेवा परीक्षा विधानसभेच्या निकालानंतरच होण्याची शक्यता आहे. आयोग निवडणुकांच्या तारखांचा अंदाज घेत परीक्षेची तारीख जाहीर करू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत